Narendra 2018 Independence Day Speech

🇮🇳 स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील  महत्त्वाचे मुद्दे

▪ सैन्य असो, निमलष्करी दल असो, आपलं पोलिस दल असो किंवा आपल्या गुप्तचर यंत्रणा असो, त्यांच्या एकजुटीमुळे देशाला अंतर्गत सुरक्षा दिली आहे - नरेंद्र मोदी

▪ न गाली से न गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से,जम्मू काश्मीरमधील जनतेला मी विश्वास देतो की आम्ही माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या मानवतावादी दृष्टिकोनातूनच पुढे जाऊ - पंतप्रधान मोदी

▪ तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्ही कायदा करतोय, पण त्याला काहीजण विरोध करत आहेत. मात्र मुस्लीम महिलांना मी आश्वस्त करतो, आम्ही तो कायदा करणारच - नरेंद्र मोदी

▪ प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा, या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणं शक्य. आज देशात पावणे सात कोटी लोकं कर भरतात. 2013 पर्यंत हा आकडा 4 कोटी होता. परंतु या 4 वर्षात हा आकडा दुपटीने वाढला आहे - नरेंद्र मोदी

▪ सरकारी अनुदान, सरकारी योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या सहा कोटी बोगस लोकांचं जाळं आम्ही उद्ध्वस्त केलं. यामधून देशाच्या तिजोरीतले 90 हजार कोटी रुपये वाचले - नरेंद्र मोदी

▪ येत्या 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करणार, 10 कोटी कुटुंबांना (50 कोटी लोक) 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार. सामान्य नागरिकांना गंभीर मेडिकल उपचारांची चिंता जाणवणार नाही - पंतप्रधान मोदी

▪ महात्मा गांधीजींनी सत्याग्रही तयार केले, त्यांच्या आगामी जयंतीदिनी आपण देशाला स्वच्छ करण्यासाठी स्वच्छाग्रही बनवू. आमच्या स्वच्छ भारत अभियानाची अनेकांनी खिल्ली उडवली, पण WHO च्या अहवालात याच अभियानामुळे 3 लाख मुलांचा जीव वाचल्याचं नमूद - नरेंद्र मोदी

▪ स्वातंत्र्यानंतरचं देशातलं हे पहिलं मंत्रिमंडळ आहे, ज्यात महिलांना सर्वाधिक स्थान आहे. देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती - नरेंद्र मोदी

▪ कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांचे हित जपणारे हे सरकार आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनापूर्वी शेतकऱ्यांना दुपटीने भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत - नरेंद्र मोदी

▪ एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातील पाच कोटी जनता गेल्या दोन वर्षांत गरिबीरेषेतून वर आले आहेत - नरेंद्र मोदी

▪ अंतराळामध्ये मानवयान पाठवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरेल. 2022 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या यानातून पहिला भारतीय अंतराळाची सफर करु शकेल - नरेंद्र मोदी

▪ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक, गरिबांना न्याय मिळावा, दलित, आदिवासींना विकासाचा अधिकार संविधानाने दिला - नरेंद्र मोदी

▪ जगभरातील अर्थतज्ज्ञांकड़ून भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक होतं आहे, छोटी गावं, शहरांमध्ये स्टार्टअपला सुरुवात झाली आहे - नरेंद्र मोदी

▪ आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला - नरेंद्र मोदी

▪ 2013 च्या वेगाने देशात सर्वत्र शौचालयं पोहोचवायला एक शतक लागलं असतं, सर्व गावात वीज पोहचवायला आणखी दोन दशके लागली असती - नरेंद्र मोदी

Comments